शुक्रवार, ०१ ऑगस्ट, २०१४
खरीप हंगाम 2014-15 साठी केंद्र शासनाने भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या सहकार्याने पीक विमा योजना सुरु केली आहे. शेतकरी बांधवांसाठी ही योजना हितकारक व लाभकारक आहे. ही योजना समजावून घेऊन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
राज्य व केंद्र सरकारमार्फत खरीप हंगाम 2014 साठी लागू केलेल्या राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा अंतिम मुदत पिकनिहाय पुढीलप्रमाणे आहे.
ज्वारी, बाजरी, मका उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकासाठी शेतकऱ्यांनी विमा प्रस्ता व बॅंकेत भरण्यारची अंतिम मुदत पिक पेरणीपासून 1 महिना किंवा 31 जुलै 2014 यापैकी जे आधी असेल ते व ऊस अडसाली लागवडीपासून एक महिना किंवा 30 सप्टेंंबर 2014, ऊस, पुर्व हंगामी लागवडीपासुन 1 महिना किंवा 31 डिसेंबर 2014, ऊस सुरु लागवडीपासून 1 महिना किंवा 30 मार्च 2015 व ऊस खोडवा लागवडीपासून एक महिना किंवा 31 मे 2015 ही आहे.
उत्पन्नावर आधारित भरपाई
• या योजनेतून पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे.
• यासाठी कृषि आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेण्यात येणाऱ्या पीक सर्व्हेक्षण अंदाजाच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• यासाठी अधिसूचीत मंडळ किंवा मंडळ गटात किमान 10 पीक कापणी प्रयोग आणि अधिसूचीत तालुका किंवा गटामध्ये किमान 16 पीक कापणी प्रयोग घेणे बंधनकारक आहे. या प्रयोगावर आधारित खरीप पिकांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी कृषि विभागामार्फत पार पाडण्यात येत आहे.
वैयक्तिक पातळीवर भरपाई
• पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे.
• यासाठी स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबधित शेतकऱ्यांनी ज्या बँकेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्यांना किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला नुकसान झाल्यापासून 48 तासाच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचीत पिकांची माहिती व नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.
• यानंतर विमा कंपनी मार्फत जिल्हा महसूल विभाग किंवा कृषि विभागाच्या मदतीने भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे. हवामान आधारित पीक विमा योजना खरीप हंगाम 2014 मध्ये जे शेतकरी सहभागी होवू शकले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना योजना लागू राहिल.
• योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे.
• तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विमा हप्त्यामध्ये 10 टक्के सूट राहील.
चालू खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केलेली आहे. त्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत विमा हप्ता रक्कमबैंकेत भरुन पिक संरक्षित करावेत.
जिल्हा माहिती कार्यालय, परभणी
खरीप हंगाम 2014-15 साठी केंद्र शासनाने भारतीय कृषी पीक विमा कंपनीच्या सहकार्याने पीक विमा योजना सुरु केली आहे. शेतकरी बांधवांसाठी ही योजना हितकारक व लाभकारक आहे. ही योजना समजावून घेऊन जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.
राज्य व केंद्र सरकारमार्फत खरीप हंगाम 2014 साठी लागू केलेल्या राष्ट्रीय कृषि पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचा अंतिम मुदत पिकनिहाय पुढीलप्रमाणे आहे.
ज्वारी, बाजरी, मका उडीद, मूग, तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीन, कापूस, कांदा या पिकासाठी शेतकऱ्यांनी विमा प्रस्ता व बॅंकेत भरण्यारची अंतिम मुदत पिक पेरणीपासून 1 महिना किंवा 31 जुलै 2014 यापैकी जे आधी असेल ते व ऊस अडसाली लागवडीपासून एक महिना किंवा 30 सप्टेंंबर 2014, ऊस, पुर्व हंगामी लागवडीपासुन 1 महिना किंवा 31 डिसेंबर 2014, ऊस सुरु लागवडीपासून 1 महिना किंवा 30 मार्च 2015 व ऊस खोडवा लागवडीपासून एक महिना किंवा 31 मे 2015 ही आहे.
उत्पन्नावर आधारित भरपाई
• या योजनेतून पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे.
• यासाठी कृषि आयुक्तालयामार्फत सादर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या पीक उत्पादनाच्या अंदाजासाठी घेण्यात येणाऱ्या पीक सर्व्हेक्षण अंदाजाच्या पीक कापणी प्रयोगावर आधारित सरासरी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
• यासाठी अधिसूचीत मंडळ किंवा मंडळ गटात किमान 10 पीक कापणी प्रयोग आणि अधिसूचीत तालुका किंवा गटामध्ये किमान 16 पीक कापणी प्रयोग घेणे बंधनकारक आहे. या प्रयोगावर आधारित खरीप पिकांची सरासरी उत्पन्नाची आकडेवारी विमा कंपनीला पाठविण्याची जबाबदारी कृषि विभागामार्फत पार पाडण्यात येत आहे.
वैयक्तिक पातळीवर भरपाई
• पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक आपत्तीमुळे होणारे नुकसान भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे.
• यासाठी स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबधित शेतकऱ्यांनी ज्या बँकेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्यांना किंवा भारतीय कृषी विमा कंपनीला नुकसान झाल्यापासून 48 तासाच्या आत नुकसानग्रस्त अधिसूचीत पिकांची माहिती व नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.
• यानंतर विमा कंपनी मार्फत जिल्हा महसूल विभाग किंवा कृषि विभागाच्या मदतीने भरपाईचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे. हवामान आधारित पीक विमा योजना खरीप हंगाम 2014 मध्ये जे शेतकरी सहभागी होवू शकले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना योजना लागू राहिल.
• योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक स्वरुपाची आहे.
• तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विमा हप्त्यामध्ये 10 टक्के सूट राहील.
खरीप हंगाम 2014-15 पीकनिहाय प्रति हेक्टरी विमा हप्ता दर व रक्कम
अ.क्र.
|
पीक
|
जोखीमस्तर
(टक्के)
|
सर्वसाधारण विमा संरक्षण प्रतिहेक्टर (उंबरठा उत्पन्न पातळीपर्यंत)
|
अतिरिक्त विमा संरक्षण प्रति हेक्टर(उंबरठा उत्पनाच्या 150टक्के पर्यंत)
| ||||
विमासंरक्षितरक्कम
|
शेतकऱ्यांनी अदाकरावयाची विमा हप्ता
|
विमासंरक्षितरक्कम
|
शेतकऱ्यांनी अदाकरावयाची विमा हप्ता
| |||||
1
|
ख. ज्वारी
|
60
|
11800
|
266
|
295
|
17700
|
1505
|
1505
|
2
|
बाजरी
|
60
|
6400
|
202
|
224
|
9600
|
1872
|
1872
|
3
|
मका
|
60
|
21400
|
482
|
535
|
32000
|
1360
|
1360
|
4
|
उडीद
|
60
|
13100
|
295
|
328
|
19600
|
4704
|
4704
|
5
|
मूग
|
60
|
12100
|
272
|
303
|
18100
|
5068
|
5068
|
6
|
तूर
|
60
|
18700
|
421
|
468
|
28000
|
2520
|
2520
|
7
|
भुईमूग
|
60
|
23800
|
750
|
833
|
35600
|
4628
|
4628
|
8
|
तीळ
|
60
|
8100
|
255
|
284
|
12000
|
1920
|
1920
|
9
|
सोयाबीन
|
60
|
17200
|
542
|
602
|
25800
|
4902
|
4902
|
10
|
कापूस
|
60
|
21200
|
2480
|
2756
|
31900
|
4147
|
4147
|
11
|
कांदा
|
60
|
97000
|
14841
|
16490
|
145400
|
24718
|
24718
|
12
|
ऊस(आडसाली)
|
80
|
181100
|
13039
|
14488
|
158500
|
12680
|
12680
|
13
|
ऊस
(पूर्व हंगामी)
|
80
|
157100
|
10604
|
11783
|
137400
|
10305
|
10305
|
14
|
ऊस (सुरु)
|
80
|
144300
|
10390
|
11544
|
126200
|
10096
|
10096
|
15
|
ऊस (खोडवा)
|
80
|
124300
|
9509
|
10566
|
108700
|
9240
|
9240
|
चालू खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी केलेली आहे. त्या शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत विमा हप्ता रक्कमबैंकेत भरुन पिक संरक्षित करावेत.
जिल्ह्यातील शेतकरी बंधूंना आवाहन करण्यात येते की, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषी विमा योजनेत सहभागी व्हावे,शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक व राष्ट्रीयकृत बैंक अथवा ग्रामस्तरावर कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा असे जिल्हा अधिक्षककृषी अधिकारी परभणी यांनी कळविले आहे.
जिल्हा माहिती कार्यालय, परभणी
Good Post. Also Check Kalia Yojana List
ReplyDelete